मराठी मध्ये बातम्या
-
‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट
बुधवार, 18 नवंबर, 2020
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3140 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3130 ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3300 ते 3375 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 418.50 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 15.51 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.190 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3285 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3136 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $42.50 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 227.34 अंकांनी वाढून येऊन 44,180.05 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 64.05 अंकांनी वर येऊन 12,938.25 अंकांवर बंद झाला.
-
दिल्लीमध्ये पुन्हा लॉकडाउन नाही
दिल्ली चे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ने स्पष्ट केले की, राजधानीमध्ये सरकार पुन्हा लॉकडाउन करणार नाही. सिसोदिया यांनी सांगितले की, कोरोनाविरोधातील संघर्षावर लॉकडाउन हा उपचार नाही. त्यांनी सांगितले की, खूप गरज पडल्यावर केवळ काही व्यस्त परिसरांमध्ये स्थानिक स्तरावर काही प्रतिबंध लागू केला जावू शकतो. सिसोदिया यांनी दुकानदारांना आश्वस्त केले की, सरकार आता कोणताही लॉकडाउन करणार नाही.
-
बाजपूर साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची तयारी पूर्ण
बाजपूर: साखर कारखान्याच्या नव्या गाळप हंगामाबाबत कारखान्याकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातून येणारे कारखान्याचे कंत्राटी कर्मचार्यांची आता कोविड टेस्टच्या निगेटीव रिपोर्ट पाहिल्यानंतरच कारखान्यामध्ये प्रवेश दिला जाईल.
मंगळवारी साखर कारखान्याचें प्रधान व्यवस्थापक प्रकाश चंद यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या नव्या गाळप हंगामाबाबत कारखान्याकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 20 नोव्हेंबरला कारखान्याचा गाळप हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे. जीएम यांनी सांगितले की, कोविड 19 संक्रमणादरम्यान कारखान्याचा गाळप हंगाम सुरु करणे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही. त्यांनी सांगितले की, या अव्हानाला झेलण्यासाठी कारखान्याने विशेष तयारी केली आहे. त्यांनी सांगितले की, कारखान्यामध्ये प्रवेेश घेण्यापूर्वी प्रत्येक कर्मचारी आणि अधिकार्याला थर्मल स्कैनिंग प्रक्रियेतून जावे लागेल तसेच आपल्या हातांना सॅनिटाइज केल्यानंतरच आत प्रवेश दिला जाईल.
-
गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामात साखर कारखान्यांनी उस गाळपात घेतली गती
गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामामध्ये साखर कारखान्यांनी उस गाळपामध्ये गती घेतली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) नुसार, गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर, 2019 ला उसाचे गाळप करणारे 127 साखर कारखान्यांच्या तुलनेत यावर्षी 15 नोव्हेंबर, 2020 ला 274 साखर कारखाने उसाचे गाळप करत आहेत.
या हंगामात चांगले पीक उत्पादन आणि गाळप वेळेवर सुरु झाल्याने उत्पादनातही वाढ झाली आहे. चालू हंगाम 2020-21 मध्ये 15 नोव्हेंबर, 2020 पर्यंत साखरेचे उत्पादन 14.10 लाख टन आहे, जे गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2019 ला 4.84 लाख टन होते.
इस्माच्या नुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत, महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये चांगला पाउस आणि जलाशयांमध्ये पुरेशा पाण्याची उपलब्धता, उसाचे अधिक उत्पादनामुळे उसाच्या चांगल्या उपलब्धतेमुळे, ऑक्टोबर 2020 च्या शेवटच्या आठड्याच्या दरम्यान गाळप हंगामाची सुरुवात चांगली होवू शकली.
-
साखर कारखान्यामध्ये तांत्रिक बिघाड आल्यानंतर शेतकर्यांनी केले ट्रॅफिक जाम
जींद, हरियाणा: साखर कारखान्यामध्ये तांत्रिक बिघाड येणे आणि काम बंद होण्यामुळे नाराज शेतकर्यांनी जींद पटियाला राष्ट्रीय राजमार्ग बंद केला. जवळपास चार तासापर्यंत मार्गावर ट्रॅफिक जाम राहिला, ज्यामुळे प्रवासी नाराज होते. शेवटी, डीसी आदित्य दहिया आणि इतर अधिकार्यांनी घटनास्थळी पोचून नाकाबंदी करणार्या शेतकर्यांना शांत केले.
10 नोव्हेंबर ला हरियाणाचे सहकार मंत्री बनवारी लाल यांनी ज्या कारखान्याचे उद्घाटन केले होते, त्या कारखान्याला कायम तांत्रिक बिघाडाला सामोरे जावे लागते. शेतकर्यांनी आपल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीज ना मोठ्या संख्येमध्ये रस्त्यावर पार्क केले.
एका शेतकर्याने सांगितले की, मी गेल्या तीन दिवसांपासून उस विकण्याची वाट पहात होतो. पण सारे व्यर्थ झाले. उसाचे वजन दिवसेंदिवस कमी होत आहे आणि शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. कारखान्याला करोडो रुपये मिळत आहेत, पण याचे उद्घटान झाल्यानंतर कारखाना चांगल्या पद्धतीने काम करत नाही. शेतकर्यांनी सांगितले की, त्यांनी डिप्टी कमिश्नर ना सूचित केले आणि जेव्हा अधिकारी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरले, तेव्हा त्यांनी राष्ट्रीय राजमार्गावर रस्ता रोको केला.
जींद चे डीसी आदित्य दहिया यांनी सांगितले की, आम्ही कैथल च्या कारखान्यामध्ये उस पाठवला आहे, जोपर्यंत तांत्रिक समस्या सुटणार नाही.
-
देशामध्ये या हंगामात आतापर्यंत झाले 14.10 लाख टन साखर उत्पादन
नवी दिल्ली: इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नुसार, चालू हंगाम 2020-21 मध्ये 15 नोव्हेंबर, 2020 पर्यंत साखरेचे उत्पादन 14.10 लाख टन आहे, जे गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2019 ला 4.48 लाख टन होता.
गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर, 2019 ला उसाचे गाळप करणार्या 127 साखर कारखान्यांच्या तुलनेत यावर्षी 15 नोव्हेंबर, 2020 ला 274 साखर कारखाने उसाचे गाळप करत आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये, 76 साखर कारखान्यांनी या हंगामासाठी आपले गाळप सुरु केले आहे आणि त्यांनी 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत 3.85 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 78 कारखाने चालू होते आणि त्यांनी 15 नोव्हेंबर, 2019 पर्यंत 2.93 लाख टन उत्पादन केले होते.
महाराष्ट्रामध्ये, 117 साखर कारखान्यांनी 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत गाळप सुरु केले आहे, तर गेल्या गाळप हंगामात दुष्काळ आणि कमी कृषी योग्य क्षेत्रामुळे गाळप उशिरा सुरु झाली होती. 15 नोव्हेंबर, 2020 पर्यंत राज्यामध्ये साखरेचे उत्पादन 5.65 लाख टन आहे.
-
दक्षिण अफ्रिका करणार घरगुती साखर उद्योगाचे समर्थन
दक्षिण अफ्रिकेने त्रस्त साखर उद्योगाचे समर्थन करण्यासाठी एका योजनेवर हस्ताक्षर केले, ज्यामध्ये कोरोना मुळे जवळपास आठ महिने उशिर झाला आहे.
कृषी आणि व्यापार आणि उद्योग विभागाने संयुक्तपणे सांगितले की, औद्योगिक उपयोगकर्ता आणि रिटेल विक्रेत्यांनी तीन वर्षांसाठी साखरेच्या न्यूनतम स्तरावर सहमती व्यक्त केली आहे, ज्यामध्ये स्थानिक कारखानदारांपेक्षा कमीत कमी 80 टक्के वापर होईल. विभागाने सांगितले की, 2023 पर्यंत वाढून 95 टक्के होईल आणि उद्योग मूल्य संयम आणि पुर्नगठन प्रक्रियेसाठी सहमत झाले आहे.
त्यांनी सांगितल्यानुसार, दक्षिण अफ्रिकेच्या वार्षिक साखर उत्पादनामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये जवळपास 25 टक्के घट झाली आहे, उस शेतकर्यांच्या संख्येमध्ये 60 टक्के घट झाली आहे.
-
चीन निर्मित उत्पादनांची लोकप्रियता भारतीयांमध्ये कमी, केवळ 29 टक्के लोकांनी केली चीनी वस्तूंची चौकशी - Yash Jasani [ 01:09 ]
चीन निर्मित उत्पादनांची लोकप्रियता भारतीयांमध्ये कमी, केवळ 29 टक्के लोकांनी केली चीनी वस्तूंची चौकशी
नवी दिल्ली: या वर्षी सणासुदीच्या खरेदी दरम्यान भारतीय ग्राहकांमध्ये चीनी वस्तुं प्रती लोकप्रियता कमी झालेली दिसून येत आहे. केवळ 29 टक्के लोकांनीच बाजारात चीनी वस्तुंबाबत चौकशी केली. ऑनलाइन मंच लोकलसर्किल्स च्या सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी बाजारात जवळपास 48 टक्के लोकांनी सणाच्या दिवसात चीनी वस्तुंबाबत चौकशी केली होती.
कंपनीने 14 हजार पेक्षा लोकांचे सर्वेक्षण केले आहे. गेल्या वर्षीही लोकांना जवळपास हेच प्रश्न विचारुुन सर्वेक्षणाचे निष्कर्ष काढले होते. कंपनीचे संस्थापक आणि चेअरमन सचिन तापडिया म्हणाले की, नोव्हेंबर 2019 मध्ये ग्राहकांना समान प्रश्न विचारले होते आणि 48 टक्के ग्राहकांनी सणासुदीमध्ये चीनी वस्तु खरेदी बाबत विचारले होते. यंदा हा आकडा कमी होउन 29 टक्के झाला आहे.
-
फिजी मध्ये उसाच्या गुणवत्तेमुळे साखर उत्पादनावर परिणाम
फिजी शुगर कॉर्पोरेशन (FSC) ने सांगितले की त्यांच्या तीन साखर कारखान्यांमध्ये ऊसाच्या कमी गुणवत्तेमुळे साखर उत्पादनावर परिणाम झाला आहे. आपल्या नव्या उद्योग अपडेट मध्ये, FSC यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून ऊस गाळपासाठी अधिक जाळलेले ऊस पाठवले जात आहेत, ज्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.
कारखानदारांनी सांगितले की, रारावई कारखान्यात 98 टक्के जळालेला ऊस मिळाला. तर लुटोका कारखान्याने 9 नोव्हेंबर पर्यंत 89 टक्के जळालेल्या ऊसाचे गाळप केले.
FSC ने सांगितले की, गेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत सर्व कारखान्यांनी 140,834 टन साखरेचे उत्पादन केले जे 4244 टन कमी होते.
-
हवन पूजन करुन कुंभी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु
अमीरनगर, उत्तर प्रदेश: बलरामपुर ग्रुपच्या कुंभी साखर कारखान्याचा नवीन गाळप हंगाम 2020-21 सोमवारी हवन आणि पूजन करून सुरु करण्यात आला. कारखाना व्यवस्थापनाने डोंगे मध्ये ऊस घालून गाळपाला सुरुवात केली. साखर कारखान्यामध्ये ऊस घेऊन आलेल्या गंगापूर ग्रंट येथील छोटेलाल यांच्या बैलगाडीचे वजन करण्यात आले. दुसरी ट्रॉली कुंभी येथील शेतकरी ठाकुर सुखपाल सिंह यांच्या ऊसाचेही वजन करण्यात आले. साखर कारखान्याचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. सुनील कुमार यादव यांनी दोन्ही शेतकऱ्यांना सन्मानित केले. कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक वाणिज्य मुकेश मिश्रा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ऊस महाव्यवस्थापक आर एस ढाका यांनी शेतकऱ्यांना चांगला स्वच्छ ऊस आणण्याची विनंती केली. यावेळी चौकी प्रभारी लल्ला गोस्वामी, सत्येंद्र सिंह, रविंद्र शुक्ला, प्रशांत चौधरी, एके सिंह, आरएन दीक्षित सहित कारखाना व्यवस्थापन आणि सामाजिक कार्यकतै उपस्थित होत.
-
धामपुर साखर कारखान्यामध्ये ऊस गाळप जोरात
धामपुर, उत्तर प्रदेश: धामपूर साखर कारखान्यामध्ये गाळप जोरात झाले. कारखान्यात 24 तासात जवळपास 1.40 हजार क्विंटल इतके ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. सध्या 24 तासात सव्वा लाख क्विंटल ऊसाचे गाळप करण्यात आले. साखर कारखान्याकडून प्रत्येक दिवशी जितके इंडेंट क्षेत्रातील ऊस समित्यांना पाठवण्यात येत आहे, त्याप्रमाणे शेतकरी साखर कारखान्याचा ऊसाचा पुरवठा करत आहेत. साखर कारखान्याचे वरिष्ठ ऊस व्यवस्थापक मनोज कुमार चौहान यांनी सांगितले की, यावेळी धामपूर साखर कारखान्याकडून प्रतिदिन 40 हजार क्विंटल कारखाना गेट आणि जवळपास 80 हजार क्विंटल ऊसाचा इंडेंट ऊस केंद्रांना समितीच्या माध्यमातून पाठवला जात आहे. शेतकरी त्याप्रमाणे साखर कारखान्याला ऊसाचा पुरवठा करत आहेत, ज्याप्रमाणे त्यांच्याकडून पुरवठ्याची अपेक्षा केली जात आहे.
-
उत्तर प्रदेश: आग लागून ऊसाचे पीक जळाले
शाकंभरी, उत्तर प्रदेश: गेल्या रात्री रजापुर नौगावा गावामध्ये आग लागून अनेक शेतकऱ्यांचे ऊस पीक जळाले. रजापुर नौगावातून बाहेरच्या बाजूला शेतकऱ्यांची शेते आहेत. ज्यामध्ये ऊसाच्या पिकाला आग लागली. रविवारच्या रात्री जवळपास दहा वाजता अचानक पिकातून आगीचे लोट येऊ लागले. सूचना मिळाल्यावर शेतकरी शेतात आले.
नागरीकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत मुकेश चौहान यांची सहा एकर, सुधीर चौहान यांची चार एकर, गिरवर चौहान यांची दोन एकर, अनिल चौहान यांची दोन एकर ऊसाची शेती जळून खराब झाली होती. पीडित शेतकऱ्यांनुसार त्यांचे जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.
-
ऊस थकबाकी भागावण्यासाठी साखर कारखान्याबाहेर निदर्शने
फगवाड़ा, पंजाब: भारतीय किसान यूनियन दोआबा यांच्या नेतृत्व मध्ये अनिश्चितकालीन धरणे आंदोलन गेल्या रविवारी फगवाड़ा साखर कारखान्याच्या बाहेर शेतकऱ्यानी केले. गेल्या हंगामातील प्रलंबित असणारी 73 करोड थकबाकी मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शेतकरी नेते मंजीत सिंह राय, कुलवंत सिंह संधू, कृपाल सिंह मुसापुर, सतविंदर सिंह संधवान, सतनाम सिंह साहनी यांनी सांंगितले की, सातत्याने तडजोडी करूनही, शेतकऱ्यांचे 73 करोड दिलेेले नाहीत.
आणि इशारा दिला आहे की, जोपर्यंत थकबाकी भागवली जाणार नाही तोपर्यंत शेतकरी साखर कारखाना पुन्हा सुरु करु देणार नाहीत.
प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा केली आणि थकबाकी लवकरात लवकर भागवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
-
‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3130 ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3300 ते 3400 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 421.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 15.47 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.489 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4058 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स .3069 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $41.20 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 314.73 अंकांनी वाढून येऊन 43952.71 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 93.95 अंकांनी वर येऊन 12874.20 अंकांवर बंद झाला.
-
21 पासून नरकटियागंज साखर कारखान्यामध्ये उस गाळप हंगाम
साखर कारखान्यामध्ये उस गाळप 21 नोव्हेंबर पासून सुरु होईल. कारखाना व्यवस्थापनाकडून याची तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी माहिती देताना न्यू स्वदेशी साखर कारखान्याचे कार्यपालक अध्यक्ष चंद्रमोहन यांनी सांगितले की, गाळप हंगाम 2020-21 चा शुभारंभ 21 नोव्हेंबरपासून केले जाईल. त्यांनी सांगितले की, उस पुरवठ्यासाठी कैलेंडर नुसार 3 दिवसापूर्वी चालान चा मॅसेज शेतकर्यांच्या रजिस्टर्ड मोबाइलवर पाठवण्यात येईल.
-
अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी: मूडीज ने 2020 साठी भारताचा जीडीपी ग्रोथ अंदाज वाढवला - Yash Jasani [ 01:03 ]
अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी: मूडीज ने 2020 साठी भारताचा जीडीपी ग्रोथ अंदाज वाढवला
नवी दिल्ली: रेटिंग एजन्सी मूडीज यांनी यावर्षासाठी भारताच्या आर्थिक वृद्धी राचा अंदाज वाढवून -8.9 टक्क्यावर ठेवला होता. याबराबेरच पुढच्या वर्षाच्या अंदाजालाही 8.6 टक्के वाढवून 8.1 टक्के केले आहे. मूडीज ने गुरुवारी ग्लोब मैक्रो आउटलुक 2021-22 नावाने एक रिपोर्ट जारी केला आहे.
भारताचा अंदाज वाढवून मुडीज ने सांगितले की, कोरोनाग्रस्तांच्या नव्या आकड्यांमध्ये कमी आल्यानंतर देशामध्ये आवागमन च्या प्रतिबंधांना कमी करण्यात येत आहे. भारतामध्ये नव्या संक्रमणाचा
मूडींजने सांगितले की, याच कारणामुळे येणार्या तिमाहीमध्ये आपण आर्थिक हालचालींमध्ये अधिक गतीची आशा करु शकतो. कमजोर आर्थिक सेक्टर मुळे क्रेडिट देण्याच्या सुविधेमद्ये सुस्तीने रिकवरी च्या गतीवर परिणाम होईल.
-
उस थकबाकी भागवण्याबाबत शेतकरी सेनेचे निवेदन
शामली: भारतीय किसान सेनेच्या पदाधिकार्यांनी शेतकर्यांच्या उस थकबाकीच्या मागणीबाबत प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या नावाने मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना दिले. ज्यामध्ये त्यांनी शेतकर्यांना पैसे न दिल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गुरुवारी भारतीय किसान सेनेच्या पदाधिकार्यांनी राष्ट्रीय प्रवक्ता विक्रांत चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये शामली कलेक्ट्रेट येथे जावून प्रदेशाचे मुख्यमंत्री यांच्या नवाने एक निवेदन एडीएम अरविंद कुमार यांना दिले. ज्यामद्ये त्यांनी सांगितले की, शेतकर्याचे देय व्याजासहित द्यावे. जोपर्यंत शेतकर्यांना सर्व देय देण्यात येत नाही तोपर्यंत शेतकर्यांची विज कापू नये. शेतकर्यांच्या खाजगी नलकूपांचा विज भार वाढवला जावू नये. यावेळी बाबूराम भंडारी, जगबीर फौजी, जितेंद्र फौजी, राहुल चौधरी, विशाल धामा, मोनू पवार आदी उपस्थित होते.
-
‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट
शुक्रवार, 13 नवंबर, 2020
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3125 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3235 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3235 रुपये ते 3285 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 ते 3400 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 408 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.86 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.628 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.04551 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3037 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $40.69 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 85.81 अंकांनी वाढून येऊन 43,443 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 29.15 अंकांनी वर येऊन 12,719.95. अंकांवर बंद झाला.
-
सिद्धेश्वर साखर कारखान्यामध्ये गाळप हंगाम सुरु
सोलापूर: श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 48 व्या गाळप हंगामाची सुरुवात आमदार प्रणिती शिंदे, आमदार संजय शिंदे आणि कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. वरिष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा या समारंभाचे अध्यक्ष होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. दिपक आलुरे, निदेशक प्रकाश वानकर, गुरुराज माळगे, आण्णाराज काडादी आदी उपस्थित होते.
सुराणा यांनी सांगितले की, जर शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी आणि कार्यकर्ता कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या गुणांना स्विकारतील, तर शेतकर्यांचे भविष्याही कारखान्याप्रमाणे उज्वल होईल. आमदार संजय शिंदे यांनी सांगितले की, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी साखर उद्योगावर लक्ष ठेवून आहेत. आता केंद्र सरकारकडून इथेनॉल धोरण तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे साखर उद्योगाचे भविष्य अधिक चांगले होण्याची शक्यता आहे.
-
केन्या: ऑडिटनंतर शेतकर्यांची साखर कंपनीच्या व्यवस्थापकांना अटक करण्याची मागणी - Yash Jasani [ 01:19 ]
केन्या: ऑडिटनंतर शेतकर्यांची साखर कंपनीच्या व्यवस्थापकांना अटक करण्याची मागणी
नैरोबी: मुहरोनी साखर कंपनीच्या व्यवस्थापकांना अटक केली जावी आणि करदात्यांच्या अरबो डॉलरची कर चोरी च्या गुन्ह्यात केस चालवली जावी. केन्या नॅशनल फेडरेशन ऑफ उस शेतकर्यांचे चेअरमन चार्ल्स ओन्हुम्बा यांनी एथिक्स एंड एंटी करप्शन कमीशन यांच्या मुख्य कार्यकारी त्वालिब म्बारक यांना या भ्रष्टाचारामध्ये लिप्त संशयितांना अटक करण्याची मागणी उस शेतकर्यांनी केली आहे.
ओन्हुम्बा यांनी सांगितले की, या लोकांना अटक करावी. ज्यांनी शेतकर्यांबरोबर दुर्व्यवहार केले आणि मुहरोनी कारखान्याचेही नुकसान केले. त्यांनी त्या लोकांच्या शांत बसण्यावरही प्रश्न उपस्थित केला आहे, ज्यांनी ऑटिड रिपोर्ट जारी झाल्यानंतर रेडियो, टीवी आणि सोशल मिडियावर व्यवस्थापकांची प्रशंसा करतात. महालेखा परीक्षकांचे म्हणणे आहे की, विक्रीच्या अंडर रिपोर्टिंग मुळे एसएच1.7 बिलियन पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. गेल्या गुरुवारी संसदेमध्ये सादर करण्यात आलेल्या ऑडिटने असे समजते की, कंपनी च्या घरांमध्ये राहणार्या 87 कर्मचारी नाहीत, तर 33 कर्मचार्यांना एकापेक्षा अधिक घरांचे वाटप करण्यात आले होते.
-
ब्राजीलमध्ये इथेनॉल निर्यातीत वाढ
ब्राजीलने ऑक्टोबर मध्ये 439.89 मिलियन लीटर इथेनॉल ची निर्यात केली, जी 2013 नंतर सर्वात अधिक मासिक प्रमाण आहे. 6 नोव्हेंबर ला जारी ब्राजीलच्या सेक्रेटिएट ऑफ फॉरेन ट्रेड च्या आकड्यांनुसार, वर्षापूर्वी दहा महिन्यांमध्ये इथेनॉल ची निर्यात एकूण 2.16 बिलियन लीटर आहे, जी 2019 च्या अवधीच्या तुलनेत 36.6 टक्के अधिक आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत इथेनॉल च्या निर्यातीने राजस्व 959.31 मिलियन पर्यंत पोचले आहे, जे वर्षानुवर्षे 15.6 टक्के होते. ऑक्टोबरमध्ये ब्राजीलच्या कारखान्यांनी इथेनॉलची निर्यात 184.87 मिलियन अमेंरिकी डॉलर पर्यंत पोचवले, जे गेल्या वर्षी या महिन्याच्या तुलनेत 75.4 टक्के अधिक आहे
-
नीतीश कुमार पुढच्या आठवड्यात घेवू शकतात मुख्यमंत्र्यांच्या रुपाने शपथ
नीतीश कुमार पुढच्या आठवड्यात चौथ्या कार्यकाळासाठी बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेवू शकतात, पण आतापर्यंत तारखेबाबत औपचारिक घोषणा केलेली नाही.
राजकीय वातावरणात असे बोलले जात आहे, की ते सोमवारी शपथ घेतली. ज्या दिवशी भाउबीज साजरी केली जाईल, कारण हा एक शुभ दिवस मानला जातो.
एनडीए चे नवनिर्वाचित आमदारांना औपचारिक पद्धतीने भेटणे आणि कुमार ना नेता म्हणून निवड करणे बाकी आहे.
-
पंजाब: शेतकरी यूनियनद्वारा उस दरात वाढ करण्याची मागणी
चंदीगढ: 30 पेक्षा अधिक यूनियन नी शुक्रवारी केंद्रा बरोबर बैठकीमध्ये सहभाग होण्याचा निर्णय घेतला आहे आणि संयुक्तपणे तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. कृषी मंत्री एनएस तोमर आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या बरोबर बैठकीचा मुख्य अजेंडा रेल्वे सेवा सुरु करुन पंजाबातील आर्थिक नाकाबंदी उठवणे हा आहे.
बीकेयू कादियान चे अध्यक्ष हरमीत सिंह कादियान यांनी सांगितले की, ही प्राथमिक बैठक असेल आणि आम्हाला असे वाटत नाही की, एका बैठकीतून खूप काही बाहेर येईल. शेतकरी संघाच्या नेत्यांनी ही मागणी केली की, राज्य सरकार उस शेतकर्यांना गेल्या वर्षाचे प्रलंबित देय द्यावे. त्यांनी सांगितले की, शेंजारील राज्य हरियाणा ने उसाच्या दरात 350 रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे, तर पंजाब मध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये उसाची किंमत स्थिर राहिली. आमची मागणी आहे की, आम्हाला एसएपी मध्ये समान वाढ दिली जावी.
-
इतर जिल्ह्यातील उसाची आवक रोखण्याचे निर्देश
मैसूर: उपायुक्त रोहिणी सिंधुरी यांनी उस शेतकर्यांना आश्वासन दिले की, त्यांनी उसाच्या दरातील वाढीसाठी राज्य सरकारला रिपोर्ट देईल. डीसी यांनी मंगळवारी उस शेतकरी संघटना आणि शेतकर्यांबरोबर बैठक घेतली. बैठकी दरम्यान रोहिणी सिंधुरी यांनी अधिक़ार्यांना इतर जिल्ह्यातून उसाची आवक ऱोखणे आणि साखर कारखान्यांना सर्वात पूर्वी 14-16 महिने जुन्या उसाचे गाळप सुरु करण्याचे निर्देश दिले. त्यानी अधिक़ार्यांना हे निश्चित करण्यासाठीही सांगितले की, साखर कारखान्यांनी उस तोड आणि वाहतुकीसाठी सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या दराप्रमाणे काम करावे.
बैठकीनंतर बोलताना राज्य उस उत्पादक संघाचे अध्यक्ष कुरुबुर शांताकुमार यांनी सांगितले की, डीसी यांना सांगितले होते की, साखर कारखाने 15-16 महीन्याच्या शेतीनंतरही उसाच्या तोडणीसाठी पुढे येत नाहीत. इतकेच नाही तर सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा कमी कीमतीवर उत्पादकांना पैसे देत आहेत. डीसी यांनी उस शेतकर्यांद्वारा उचलण्यात आलेल्या मुद्द्यांबाबत सरकारला पत्र लिहिण्याचे आश्वासन दिले, आणि सरकारकडून वाढत्या उत्पादन मूल्याला पाहता उस दर वाढवण्याचे आश्वासन दिले.
-
ट्रकच्या धडकेत ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटली
संभल, उत्तर प्रदेश: गुन्नौर कोतवाली परिसरामध्ये आमदारांच्या घराजवळ वेगाने येणार्या ट्रकच्या धडकेत ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटली. या दुर्घटनेमध्ये ट्रॅक़्टर चालक जखमी झाला. जखमी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनेनंतर चालक ट्रक घेवून फरारी झाला.
गुन्नौर आमदार अजीत कुमार उर्फ राजू यादव यांच्या बबराला मद्ये स्थित घराजवळ बुधवारी सकाळी वेगाने येणार्या ट्रक ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरात धडक दिली. सलेमपूर गावातील नागरीक हरेंद्र सिंह ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये उस घेवून रजपुरा साखर कारखान्याकडे जात होता. ट्रक ने जोरात धडक दिल्याने ट्रॉली पलटी झाली. दुर्घटनेमध्ये ट्रॅक्टर चालक हरेंद्र जखमी झाला. दुर्घटनेनंतर चालक ट्रक घेवून पळून गेला. ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्यामुळे सकाळी काही तासांसाठी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
-
शेतकर्यांच्या समस्येबाबत ऊस आयुक्तांना भेटले भाकियू भानु चे पदाधिकारी
हापुड़, उत्तर प्रदेश: भाकियू भानु चे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये एका प्रतिनिधी मंडळाने लखनऊ मध्ये ऊस आयुक्तांची भेट घेवून त्यांना शेतकर्यांच्या समस्या सांगितल्या. ज्यामध्ये ऊस थकबाकी, कारखान्यांकडून शेतकर्यांचे केले जाणारे शोषण तसेच शेतकर्यांना योग्य पावत्या मिळण्याबरोबरच हिरनपुरा गावातील क्रय केंद्राबाबतही चर्चा करण्यात आली.
भाकियू भानु चे जिल्हाध्यक्ष पवन हूण यांच्या नेतृत्वामध्ये भाकियू भानु चे पदाधिकारी लखनऊ ऊस आयुक्त संजय आर भूसरेड्डी यांना भेटले. उस आयुक्तांशी बोलताना पवन हूण एवं मनोज र्फौजी यांनी सांगितले की, आतापर्यंत कारखान्यांकडून गेंल्या वर्षी खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे शेतकर्यांना दिलेले नाहीत. तर 14 दिवसांमध्येच उस थकबाकी देण्याबाबत चर्चा झाली होती.
-
भारतीय अर्थव्यवस्थेला मिळतेय चांगली गती: वित्त मंत्री निर्मला सितारमण
नवी दिल्ली : वित्त मंत्री निर्मला सितारामण यांनी सांगितले की, एका मोठ्या लॉकडाउननंतर भारतीय अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळालेली दिसून येत आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेला मजबूती देण्यासाठी काही आणखी प्रोत्साहनांची घोषणा करण्यासाठी आयोजित संमेलनात सांगितले की, व्यापक आर्थिक संकेतक परिस्थितीमध्ये सुधारणेकडे इशारा करत आहेत.
सीतारमण यांनी सांगितले की, कोविड 19 चे सक्रिय रुग्ण 10 लाखापेक्षा अधिक होते, पण आता ही संख्या कमी होवून 4.89 लाख राहिले आहेत. आणि मृत्यु दरात घट होवून 1.47 टक्क्यावर आली आहे. अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा झाल्याचे सांगताना त्यांनी सांगितले की, कंपन्यांच्या कारभाराच्या गतीचा संकेत देणारा कंपोजिट परचेजिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ऑक्टोबरमध्ये वाढून 58.9 राहिला, जो यापूर्वीच्या महिन्यामध्ये 54.6 होता.
त्यांनी सांगितले की, ऑक्टोबर दरम्यान उर्जेच्या वापरामध्ये 12 टक्के वाढ झाली, तर वस्तु तसेच सेवा कराचा संग्रह 10 टक्क्याने वाढून 1.05 लाख करोड रुपयांपेक्षा अधिक झाला. वित्त मंत्री यांनी सांगितले की, दैनिक रेल्वे माल वाहतुकीमध्ये सरासरी 20 टक्के दराने वाढ झाली आहे.
-
नेपाळ: वाढत्या प्रदुषणामुळे साखर कारखान्याविरोधात स्थानिक लोकांचे धरणे
बारा, नेपाळ: कलाइया मध्ये स्थानिक लोकांनी रिलायन्स शुगर अॅन्ड केमिकल इंडस्ट्रीज प्राइव्हेट लिमिडेट पासून प्रदुषण रोखण्याबरोबरच नुकसान भऱपाईची मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी दावा केला की, कारखान्यातून निघणार्या प्रदुषणकारी रसायनांमुळे स्थानिक नागरीकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. कारखाना प्रदूषण कमी करणे आणि भरपाई ची मागणी करुन श्रीपूर, मझौलिया आणि उत्तरजीतकाई सारख्या ठिकाणी शेकडो नागरीक कारखान्याविरोधात रस्त्यावर उतरले, आणि कारखान्यासमोर धरणे आंदोलन करत आहेत.
संंघर्ष समितीचे सदस्य इंद्रदेव कुशवाहा यांनी सांगितले की, लोक कारखान्यातून निघणार्या दूर आणि राखेमुळे आजारी पडत आहेत. पण कारखाना प्रशासन आणि उद्योग विभागाने ही समस्या दूर करण्यासाठी काहीही केलेले नाही. यासाठी आम्हाला नाइलाजाने आंदोलन सुरु करावे लागत आहे. स्थानिक नागरीक बीरेंद्र गोसाई यांच्या नुसार, औद्योगिक क्षेत्रामध्ये स्थानिक लोकांना डोळे दुखी, डोकेदुखी, जुलाब आणि श्वासाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. जवळपास सात वर्षापूर्वी कारखान्याच्या प्रदूषणाला नियंत्रीत करण्यासाठी स्थानिक लोक आणि उद्योग व्यवस्थापनाच्या दरम्यान 18 सूत्री करार झाला होता.
-
‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट
गुरुवार, 12 नवंबर, 2020
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3125 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3235 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3235 रुपये ते 3285 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 ते 3400 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 404 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.79 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.648 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3658 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3078 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $41.19 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 236.48 अंकांनी खाली येऊन 43,357.19 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 48.35 अंकांनी खाली येऊन 12,690.80 अंकांवर बंद झाला.
-
कर्नाटक: उस दर प्रति टन 3,500 रुपये करण्याची मागणी
बेंगलुरु: कर्नाटक राज्य रयथ संघ आणि हासिरु सेना यांनी सांगितले की, राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकर्यांना प्रलंबित थकबाकी भागवलेली नाही आणि सरकारला शेतकर्यांना थकबाकी भागवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सरकारला नव्या हंगामसाठी उस दर प्रति टन 3,500 रुपये निश्चित करण्याची मागणीही केली.
ते जमिन सुधार अधिनियमामध्ये नवी संशोधने लागू करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या अध्यादेशाला शेतकरी विरोधी सांगून राज्यव्यापी आंदोलन सुरु करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. केआरआरएस आणि हासिरु सेनेचे राज्य अध्यक्ष बडगलपूर नागेंद्र यांनी आरोप केला की, येदियुरप्पा, ज्यांनी शेतकर्यांच्या नावावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, शेतकर्यांच्या हितांविरोधात काम करत आहेत.
-
उत्तर प्रदेशातील उस शेतकर्यांमध्ये पोलिसांचे जनजागृती अभियान
बिजनौर: उत्तर प्रदेश पोलिस पश्चिमी यूपी च्या उस शेतकर्यांमध्ये जनजागृती अभियान सुरु केला आहे, ते शेतकर्यांना प्रदूषण होवू नये यासाठी वैरण न जाळण्याबाबत विनंती करत आहेत. पोलिसांची पथके शेतांमध्ये जावून शेतकर्यांना भेटत आहेत आणि त्यांना प्रदूषण रोखण्याचा संदेश देत आहेत. पश्चिमी उत्तर प्रदेशामध्ये शेतकरी पुढच्या गव्हाच्या पीकासाठी आपल्या शेतांना साफ करण्यासाठी पीक कापल्यानंतर उसाची वैरण जाळतात. उस गाळप हंगाम सुरु झाला आहे आणि अधिकतर कारखाने आणि गुर्हाळघरे यानीं आपले परिचालन सुरु केले आहे. उसाची तोडणीही जोरात सुरु आहे. उस उत्पादक पुढच्या पीकासाठी आपल्या शेतांना साफ करत आहेत.
कृषी विभाग आणि राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड, अवशेषांच्या हानिकारक परिणामांबाबत शेतकर्यांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी सेमिनार आयोजित करत आहेत, ज्या माध्यमातून हे सांगितले जात आहे की, अवशेषांपासून निर्माण होणार्या धुरामुळे हवा प्रदुषित होते आणि मनुष्य व जनावरांसाटी धोका निर्माण करते.
-
केन्या: उस थकबाकी फास्ट ट्रैक करण्याचे नोझिया साखर कंपनीचे आश्वासन
केन्या: नोझिया शुगर कंपनीने शेतकर्यांचे KES 113 मिलियन इतकी थकबाकी फास्ट ट्रैक करण्याचे आश्वासन दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी वंजला माकोचा यांनी सांगितले की, कंपनी थकबाकी भागवणे आणि सध्याचे देय पूर्ण करण्यासाठी पैसे भागवण्याच्या योजनेवर काम करत आहे.
गेल्या आठवडा, साखर कारखान्यासाठी अनुबंधित शेतकर्यांनी विलंबित थकबाकी भागवण्याचा विरोध केला होता आणि काहींनी दावा केला होता की, 2017 मध्ये पुरवठा करण्यात आलेल्या उसाचे अजूनपर्यंत दिलेले नाहीत. नोझिया, मुहुरोनी, चेमेलिल, मिवानी आणि सोनी कारखाने खाजगीकरणाच्या उंबरठ्यावर आहेत.
-
महाराष्ट्रामध्ये रिकवरी दर 92 टक्के, पूर्वीच्या तुलनेत रुग्णांमध्ये घट
मुंबई: महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासामध्ये कोरोनाचे 4,907 रुग्ण समोर आले आणि 125 रुग्णांचा मृत्यु झाला. तर 9,164 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य विभागाच्यानुसार, राज्यामध्ये एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 17,31,833 पर्यंत पोचला आहे. ज्यामध्ये 88,070 रुग्ण सक्रीय आहेत. तर 15,97,255 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यामध्ये आतायर्पंत या महामारीमुळे 45,560 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. नगर निगम, ग्रेटर मुंबईच्या अनुसार राजधानी मुंबईमध्ये एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 2,66,746 वर पोचली आहे. आतापर्यंत 2,39,800 रुग्ण बरे झाले आहेत. तर 12,674 रुग्ण सक्रीय आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण 10,503 लोकांचा या महामारीमुळे मृत्यु झाला आहे.
-
साखर कारखाना परियोजना पूर्ण होण्याची मुदत पुन्हा वाढवली
करनाल: जिल्हा प्रशासनाकडून जवळपास 270 करोड रुपये मूल्य असणारा नवा करनाल सहकारी साखर कारखाना परियोजना पूर्ण होण्याची मुदत मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पहिल्यांदा ही परियोजना 25 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होण्याची योजना बनवण्यात आली होती. पण कामामध्ये मंद गती आणि कोरोना लॉकडाउनमुळे कंपनीने आतापर्यंत केवळ 40 टक्के काम पूर्ण केले आहे.
उपायुक्त निशांत कुमार यादव यांनी सांगितले की, लॉकडाउन मध्ये श्रमाच्या कमीमुळे अनेक प्रतिबंध होते, ज्यामुळे कंपनीला काम करण्यात बाधा आल्या. कंपनीने सहा महिन्यांची मुदत मागितली आहे, आम्ही परियोजना पूर्ण करण्याची वेळ मार्च 2021 निश्चित केली आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी 20 जानेवारी, 2018 ला नवा करनाल सहकारी साखर कारखान्याची आधारशिला ठेवली होती.
-
‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट
बुधवार, 11 नवंबर, 2020
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3125 ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3240 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3235 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3235 रुपये ते 3285 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये होता.
गुजरात: M/30 चा व्यापार 3171 ते 3211 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 ते 3400 रुपये राहिला.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 399.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.66 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.256 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4150 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3171 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $42.63 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 316.02 अंकांनी वर येऊन 43,593.67 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 118.05 अंकांनी वर येऊन 12,749.15 अंकांवर बंद झाला.
-
तामिलनाडू: थकबाकी न भागवल्याने उस शेतकरी वळत आहेत दुसर्या पीकाकडे
तंजावुर, तामिळनाडू: जिल्ह्यातील उस शेतकर्यांनी साखर कारखान्याला 27 करोड रुपये थकबाकी भागवण्याचे अपील केले आहे, जीे 2016 पासून प्रलंबित आहे. थकबाकीच्या भागवण्याच्या मागणीबाबत त्यांनी कलेक्ट्रेट च्या समोर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील कुरुंकुलम, ओरथानडू, वल्लम, थिरुक्कट्टुपल्ली सह अनेक क्षेत्रांमध्ये हजारो उस शेतकर्यांनी 14,000 एकरामध्ये उसाची शेती केली होती.
शेतकर्यांनी आरोप केला आहे की, कारखाना अधिकार्यांनी 2015-16 हंगामातील थकबाकी अजूनही भागवलेली नाही. तंजावुर जिल्ह्यामध्ये शेतकरी साधारणपणे हजारो एकरमध्ये उसाची शेती करतात. कारखान्यांकडून थकबाकी न भागवल्याने, उस शेतकरी आता हळू हळू तांदळाच्या पीकाकडे वळत आहेत.
-
मुसळधार पाउस आणि पूरामुळे झालेल्या नुकसानीची भऱपाई देण्यासाठी आंध्रप्रदेशने केंद्राकडे केली मागणी - Yash Jasani [ 01:50 ]
मुसळधार पाउस आणि पूरामुळे झालेल्या नुकसानीची भऱपाई देण्यासाठी आंध्रप्रदेशने केंद्राकडे केली मागणी
अमरावती: मुसळधार पाउस आणि पुरामुळे आंध्र प्रदेश ने सरकारकडून आर्थिक सहकार्य मागितले आहे. राज्य सरकारने सोमवारी केंद्राकडे आग्रह केला की, ऑगस्ट ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये मोठा पाउस आणि पूर आल्याने 5,279 करोड रुपयांचे नुकसान झाले आहे. आंध्राचे मुख्य सचिव नीलम साहनी यांनी संयुक्त सचिव सौरव यांच्याकडून अंतर मंत्रालयी केंद्रीय टीमला सांगितले की, ऑगस्ट, सितम्बर आणि ऑक्टोबर दरम्यान कृष्णा आणि गोदावरी नद्यांना पूर आल्याने आंध्र प्रदेशाचे 6,320.83 करोड रुपये नुकसान झाले आहे. तांदुळ, मका, कापूस, काळाचणा आणि उसासारख्या 2,12,588 हेक्टर मध्ये असणार्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे 5,279.11 करोड रुपयांच्या दिलासा पॅकेजची गरज आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय आपदा दिलासा कोषाच्या मानदंडांनुसार 840.07 करोड रुपयांची आवश्यकता आहे.
मुख्य सचिव नीलम सहानी यांनी सचिवालयामध्ये उच्च स्तरीय बैठक घेवून सांगितले की, नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी 4,439.14 करोड रुपयांची आवश्यकता आहे. मुख्य सचिव नीलम सहानी यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशामध्ये 13 ऑगस्ट ते 17 ऑक्टोबरपर्यंत चार लो प्रेशर सिस्टीम आणि बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या वादळामुळे मोठा पाउस झाला. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून सर्वोत्तम बचावासाठी प्रयत्नांशिवाय भिंत पडणे, बुडणे आणि भूस्खलन सारख्या पावसाशी संबंधीत घटनांमध्ये 45 लोकांचा मृत्यु झाला असून, पाच लोक गायब आहेत.
-
नेपाळमध्ये उस थकबाकीचा मुद्दा झाला गरम
कठमांडू: साखर कारखान्यांकडून थकबाकी भागवण्यामध्ये उशिर झाल्याने ऊस शेतकरी सरकारच्या सहकार्याची मागणी करत आहेत. पण सरकारच्या नुसार, थकबाकीचे सरकारी आकडे आणि शेतकर्यांचे आकडे एकमेकांशी सुसंगत नाहीत. ज्यामुळे थकबाकीचा मुद्दा अधिक गरम झाला आहे. उस शेतकरी संघर्ष समितीचे नेता राकेश मिश्रा यांच्या नुसार, गेल्यिा पाच वर्षांपासून कमीत कमी 6,000 उस शेतकर्यांना 360 मिलियन रुपये मिळालेले नाहीत. त्यांनी पुढे सांगितले की, देशभऱातील शेतकर्यांना मिळणारी एकूण थकबाकी 1.2 बिलियन आहे. दुसरीकडे उद्योग आणि वाणिज्य आणि पुरवठा मंत्रालयाचे सहायक प्रवक्ता उर्मिला केसी यांनी दावा केला की, अधिकोश साखर कारखान्यांनी यापूर्वीच शेतकर्यांना पैसे दिले आहेत.
-
उस शेतकर्यांची थकबाकी लवकर भागवावी: मंत्री सुरेंश राणा
शामली: उत्तर प्रदेश सरकारमध्यें कैबिनेट मंत्री सुरेश राणा यांनी आपल्या फार्म हाउस वर सहानरपूर मंडलाच्या वाहतुक निगम आणि उस विभागाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी शामली जनपदमध्ये लवकर रोडवेज डेपो सुरु करण्याचे काम लवकर सुरु करणे आणि उस शेतकर्यांच्या संबंधामध्ये अधिकार्यांना दिशा निर्देश दिले.
त्यांनी उस विभागाच्या अधिकार्यांना निर्देश दिले की, थकबाकी भागवण्यात उशीर होत आहे. शामलीमध्ये उसामुळे ट्रॅफिक जाम होतो, ती समस्या सोडवली जावी. आणि शेतकर्यांना वेळेवर त्यांची पावती मिळावी, ज्यामुळे शेतकरी गव्हाच्या पीकाची लागवड योग्य वेळेत करतील. तर वाहतुक निगमच्या अधिकार्यांना कैबिनेट मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, गाव फतेहपूर मध्ये जो वाहतुक निगम चा रोडवेज डेपो बनणार आहे, त्याच्या निर्माणामध्ये जो निधी स्विकृत होणारा आहे, तो लवकर निर्माण व्हावा. दरम्यान आरएम सहारनपूर नीरज सक्सेना, एआरएम मनोज वाजपेई, उस उपायुक्त सहारनपूर जनेश्वर मिश्र, जिल्हा उस अधिकारी शामली विजय बहादुर सिंह आदी उपस्थित होते.
-
हरियाणा: शाहाबाद सहकारी साखर कारखान्यामध्ये गाळप हंगाम सुरु
कुरुक्षेत्र: शाहाबाद आमदार आणि हरियाणा शुगर फेड चेअरमन राम करन काला यांनी मंगळवारी शाहाबाद सहकारी साखऱ कारखान्याच्या 37 व्या गाळप हंगामाचे उद्घाटन केले. त्यांनी सांगितले की, शेतकर्यांची प्रत्येक क्षेत्रात महत्वाची भूमिका आहे आणि त्यांना कारखान्यांना उस पोचवण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येवू नये. या कारखान्याने केवळ हरियाणा च नाही तर पूर्ण भारतामध्ये आपल्या कार्यशैली मुळे विक्रम प्रस्थापित केला आहे. आणि हा कारखाना शेतकर्यांच्या खात्यात वेळेवर उसाचे पैसे जमा करतो.
शाहाबाद साखर कारखान्याचे प्रबंध निदेशक वीरेंद्र चौधऱी यांनी सांगितले की, 2020-21 च्या गाळप हंगामासाठी या कारखान्याने जवळपास 11 टक्के रिकवरीसह 80 लाख क्विंटल उसाचे गाळप करुन 8.80 लाख क्विंटल साखर उत्पादनाचे ध्येय ठेवले आहे.
-
करनाल साखर कारखान्यामध्ये 10 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु
करनाल: उपायुक्त निशांत कुमार यादव यांनी सांगितले की, द करनाल सहकारी साखर कारखाना लिमिटेड च्या नव्या गाळप हंगामाची सुरुवात 10 नोव्हेंबर ला केली जाईल. त्यांनी समितीच्या सदस्यांना अपील केले की, त्यांनी कारखान्यामध्ये जास्तीत जास्त उस आणण्यासाठी शेतकर्यांना जागरुक करावे.
उपायुक्त मंगळवारी साखर कारखान्याची बोर्ड कमेटी च्या बैठकीला संबोधित करत होते. बैठकीमद्ये सर्वसंमतीने अनेक निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये शेतकर्यांच्या सुविधेसाठी शेतकरी विकास केंद्र उघडले जाईल. या केंद्रामध्ये शेतकर्यांना खत, बि बियाणे उपलब्ध करवले जाईल. बैठकीमध्ये एमडी साखर कारखाना अदिती यांनी सांगितले की, शेतकर्यांच्या सुविधेसाठी कारखान्याकडून अनेक प्रकारची सुविधा दिली जात आहेत. कारखाना घाट्यातून उभा राहावा यासाठी कारखान्याकडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. करनाल कारखाना उत्पादनाच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रथम येत आहे. यावेळी करनाल साखर कारखाना पहिला राहिल, यासाठी त्यांनी आश्वासन दिले आहे.
-
पुढच्या वर्षीच्या जानेवारीपर्यंत येवू शकते कोरोना वैक्सीन: सीरम इंस्टीटयूट चे सीईओ - Yash Jasani [ 01:28 ]
पुढच्या वर्षीच्या जानेवारीपर्यंत येवू शकते कोरोना वैक्सीन: सीरम इंस्टीटयूट चे सीईओ
पूणे स्थित देशातील सर्वात मोठ्या औषधांचे निर्माते सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी बुधवारी सांगितले की, जर रेगुलेटरी बॉडीज ला वेळेत जर मंजूरी मिळाली तर देशामध्ये पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत कोरोना वैक्सीन उपलब्ध होईल.
अदर पूनावाला यांनी सांगितले की, भारत आणि यूनाइटेड किंगडम मध्ये टेस्टिंग ची सफलता आणि जर वेळेत रेगुलेटरी बॉडीज ला मंजूरी मिळते. याबरोबरच जर हे प्रतिरोधक आणि प्रभावी असेल तर आपण ही आशा करु शकतो की, भारतामध्ये 2021 जानेवारीपर्यंत वैक्सीन येईल.
सीरम इंस्टीट्यूट ब्रिटीश स्वीडिश औषध कंपनी इस्ट्रोजेनिका बरोबर मिळून कोविड 19 वैक्सीन बनवत आहे. कोविशील्ड ला ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी ने तयार केले आहे आणि या वेळी देशामध्ये दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील ट्रायल सुरु आहे. सीरम इंस्टीट्यूट कडून याला कमी आणि मध्यम वर्गातील देशांसाठी तयार केले जात आहे.
पूनावाला यांनी सांगितले की, जगभरामध्ये हजारो लोकांना वैक्सीन देण्यात आले. यामध्ये सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही चिंता नाही. त्यांनी सांगितले की, याचे परीणाम जाणून घेण्यासाठी दोन तीन वर्षाचा वेळ लागेल.
-
फिजी: विमल दत्त बनले शुगर केन ग्रोवर्स काउंसिल चे नवे सीईओ
सुवा: फिजीच्या उस उत्पादक परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता विमल दत्त पद सांभाळतील. विमल दत्त यापूर्वी शुगर केन ग्रोवर्स फेड मध्ये परिचालन व्यवस्थापक होते. त्यांनी सुनील चौधरी यांची जागा घेतली आहे. फिजी मध्ये या हंगामात गेल्या हंगामाच्या तुलनेत उसाचे अधिक गाळप झाले. यावर्षी गाळप गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 5 टक्के जास्त आहे.
त्यांच्या निवडीनंतर त्यांचा उद्देश साखर उद्योग वाढवणे आणि उस शेतकर्यांना प्रगतीपथावर नेणे हा आहे.
-
पाकिस्तान: स्वस्त साखरेसाठी स्टोरच्या बाहेर मोठी रांग
रावलपिंडी: वाढती महामार्ग मुळे वैतागलेल्या लोकांसाठी पाकिस्तान सरकार कडून दुकानावर स्वस्त साखर विकली जात आहे. स्वस्त साखर खरेदी करण्यासाठी शहरामध्ये सरकारी सबसिडी वाल्या दुकानाच्या बाहेर लोकांच्या मोठया रांगा दिसून आल्या. दुकानामध्ये 70 रुपये प्रति किलो च्या स्वस्त दरात साखर उपलब्ध आहे, खुल्या बाजारात तीच साखर 120 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. महिन्याच्या सुरुवातीला खाजगी आणि सरकारी कर्मचारी आपला पगार घेतल्यानंतर स्वस्त दरांवर सामान आणण्यासाठी दुकानात जातात. स्वस्त साखर खरेदीसाठी दुकानावर सामान्य पेक्षा अधिक गर्दी दिसून आली. परिणामी, अधिकांश दुकानातील साखर काही तासाच्या आत विकली गेली. अनेक लोकांना रिकाम्या हातांनी घरी जावे लागले. दुकानाच्या व्यवस्थापनाने सांगितले की, त्यांच्याजवळ पुरेसा स्टॉक होता. पण महिन्याच्या सुरुवातीला असामान्य गर्दीमुळे साखरेसह इतर वस्तूंचा स्टॉक लवकर संपला.
-
तेलंगाना: संगारेड्डी जिल्ह्याच्या अधिकार्यांना उस गाळपासाठी वैकल्पिक व्यवस्था करण्यास सांगितले - Yash Jasani [ 01:12 ]
तेलंगाना: संगारेड्डी जिल्ह्याच्या अधिकार्यांना उस गाळपासाठी वैकल्पिक व्यवस्था करण्यास सांगितले
हैदराबाद, तेलंगाना: तेलंगाना चे वित्त मंत्री टी हरीश राव यांनी संगारेड्डी जिल्ह्याच्या अधिकार्यांना उसाच्या गाळपासाठी वैकल्पिक व्यवस्था करण्यास सांगितले आहे. कारण ट्राइडेंट शुगर इंडस्ट्रिज यंदा गाळप करण्याच्या स्थितीमध्ये नाही. त्यांनी अधिकार्यांना निर्देश दिले की, त्यांनीे ट्राइडेंट कंपनी ला राजस्व वसूली अधिनियम नुसार नोटीस जारी करावी. संगारेड्डी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, मंत्र्यांनी उस गाळपाकडे पाहता ट्राइडेंट आणि इतर साखर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकर्यांबरोबर बैठक केली.
जहीराबाद क्षेत्रातील उस शेतकर्यांना चिंता न करण्यसाठी सांगून, हरीश राव यांनी सांगितले की, इतर साखर कारखान्यां बरोबर उस गाळपासाठी भागीदारी करतील.
थकबाकी देय प्रकरणात त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की व्यवस्थापन कित्येक महिन्यांपासून 1400 शेतकर्यांना 12.70 कोटी रुपयांचे थकबाकी देण्यास अपयशी ठरले आहे. झहीराबादमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
-
कोविड 19 दरम्यान 46 टक्के भारतीयांनी आपला घरखर्च चालवण्यासाठी घेतला उधारीचा आधार - Yash Jasani [ 01:30 ]
कोविड 19 दरम्यान 46 टक्के भारतीयांनी आपला घरखर्च चालवण्यासाठी घेतला उधारीचा आधार
नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या दरम्यान जवळपास अर्ध्या भारतीयांनी आपला घरखर्च चालवण्यासाठी कर्जाच्या रकमेवर निर्भर आहेत. एका अहवालात ही माहिती मिळाली आहे. होम क्रेडिट इंडिया ने एका अहवालात सांगितले आहे की, कोरोना दरम्यान इंडस्ट्रिज मध्ये नोकर्या जाणे आणि पगारामध्ये कपातीमुळे निम्न आणि मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे आणि लोक लोन आणि उधार घेण्यासाठी मजबूर होत आहेत.
या सर्वेनुसार, 46 टक्के उत्तरदाता आपला घरखर्च चालवण्यासाटी कर्जाच्या रकमेवर निर्भर आहेत. हा सर्वे कोरोना संक्रमणाच्या फैलावाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन दरम्यान लोकांच्या उधारीच्या पॅटर्नला समजून घेण्यासाठी सात शहरांच्या 1,000 उत्तरदात्यांमध्ये करण्यात आला होता.
सर्वे रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे की, वेतन कपात आणि वेतन देण्यात विलंब हे याचे सर्वात मोठे कारण होते, ज्यामुळे अधिकांश लोकांनी कर्जाकडे कल केला. 27 टक्के उत्तरदात्यांनी उधार घेेण्याच्या मागे आपल्या जुन्या लोनच्या मासिक हप्त्यांच्या पुनर्भुगतान चे दुसरे मोठे कारण सांगितले. अहवालात सांगितले आहे की, 14 टक्के उत्तरदात्यांनी यासाठी उधार घेतले, कारण त्यांची नोकरी कोरोना महामारीच्या दरम्यान गेली होंती.
-
मालगाडीतून चोरी करण्यात आलेली सात पोती साखर जप्त, एकाला अटक
गया-कोडरमा रेल सेक्शन च्या गझन्डी स्टेशनजवळून मंगळवारी रात्री अशिरा आरपीएफ च्या टीमने कारवाई करुन मालगाडीतून चोरी करण्यात आलेली सात पोती साखर जप्त करण्यात आली. तसेच चोरी करणार्यांमध्ये एका युवकाला अटक करण्यात आली. गयाकडून धनबाद कडे जात असलेल्या एजेडीए स्पेशल मालगाडी च्या वैगन संख्या एनडब्ल्यूआर-12078 मधून अपराध्यांनी साखरेची चोरी केली होती. जेव्हा मालगाडी चौबे स्टेशन पोचली तेव्हा आरपीएफ ने नियमित तपासणीच्या क्रमामध्ये एक वैगन खुला दिसला. सिक्युरिटी कंट्रोल ला सूचना देण्यात आली. सिक्युरिटी कंट्रोल कडून सूचना मिळाल्यावर कोडरमा आरपीएफ इंस्पेक्टर जवाहर लाल यांनी ट्रॅक ची पेट्रोलिंग केली. दरम्यान गझन्डी स्टेशन जवळून एका युवकाला सात पोती साखरेसह पकडण्यात आले. चौकशीमध्ये युवकाने आपले नाव गोविंद तुरी सांगितले. यावेळी त्याला अटक करण्यात आली.
-
मोदी साखर कारखान्याने केला गाळप हंगाम सुरु
गाजियाबाद: उत्तर प्रदेशामध्ये साखर कारखान्यांनी गाळप सुरु केले. मोदी साखर कारखान्यानेही बुधवारी गाळप हंगामाची सुरुवात केली. यावेळी आमदार डॉ. मंजू शिवाच, मोदी इंडस्ट्रिज चे चेअरमन सेठ उमेश कुमार मोदी, भोजपूर ब्लाक चे प्रमुख कृष्णबीर सिंह सह मान्यवर उपस्थित होते.
सेठ उमेश कुमार मोदी यांनी कारखाना सुरु झाल्यावर शेतकर्यांनी अभिनंदन केले. उस थकबाकीच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितले की, जसे पैसे येतील, त्यातून थकबाकी भागवली जाईल.
-
उसाने भरलेली ट्रॉली पलटली
मंडी धनौरा, उत्तर प्रदेश: बाईपास मार्गावर कलाली चुंगीच्या जवळ बुधवारी दुपारनंतर उसाने भरलेली ट्रॉली अनियंत्रित होवून पलटली. सुदैवाने ट्रॉली आणि उसाच्या विळख्यात कोणीतीही जिवित हानी झाली नाही. ट्रान्सफॉर्मर जवळ ट्रॉली च्या पलटण्यामुळे ही दुर्घटना होता होता वाचली. यामुीळे साखर तासापर्यंत बाईपास वर ट्रॅफिक जाम लागला होता. पोलिस आल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला.