गणपतीची अनेक रूपं आहेत. मयुरेश्वर, सिद्धिविनायक, वरदविनायक, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर आणि महागणपती अशी गणपतीची विविध रूपं आणि अनेक नावं. या सर्व रुपांना आपण अष्टविनायक म्हणतो. अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या सर्व गणपतींची आणि त्यांच्या मंदिरांची लीला अगाध आहे. पौराणिक महत्त्व असलेले अष्टविनायक गणपती इतके प्राचीन आहेत की गणेशपुराण आणि हिंदू धर्माची संपूर्ण माहिती सांगणाऱ्या मुद्रल पुराणात त्यांचा उल्लेख आढळतो. यामागे एक पौराणिक कथा अशी आहे की, सृष्टीचा निर्माता असलेल्या ब्रह्मदेवाने गणपतीसाठी एक भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी अशी होती की, गणेश प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या रुपात प्रकट होईल. सतयुगात विनायकाच्या रुपात, त्रेतायुगात मयुरेश्वर, द्वापारयुगात गजाननाच्या रुपात गणेश देव प्रकट होतील. तसेच धूम्रकेतूच्या रुपात कलियुगात गणपतीची उपासना केली जाईल. गणपतीची ही नानाविध रूपं , गणपतीची ८ शक्तिपीठ म्हणून ओळखली जातात. आज या ८ रूपांची ८ मंदिरं स्थापन झाली आहेत. या मंदिरांमध्ये कायम भक्तांची गर्दी असते. आज याच आठ रूपांच्या आठ मंदिरांची यात्रा 'अष्टविनायक यात्रा' ओळखली जाते.
-
मयुरेश्वर
अष्टविनायक यात्रेचा पहिल्या टप्प्या म्हणजे पुण्यात असलेलं मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिर. पुण्यापासून ८० किलोमीटर दूर , करहा नदीच्या किनारी असलेल्या या मंदिरात चतुर्भुज अशा गणपतीच्या मूर्तीचं दर्शन होतं. या गणपतीला तीन नेत्र आहेत. मंदिरातील गणपती बसलेल्या मुद्रेत असून, गणेशाची सोंड डाव्या बाजूला आहे
-
सिद्धिविनायक
सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिर २०० वर्ष जुनं असून उंच डोंगराच्या माथ्यावर स्थापित आहे. अहमदनगर जिल्ह्यात भीमा नदीच्या किनाऱ्यावर सिद्धटेक नावाचं छोटंसं गाव आहे. या गावाच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या भीमा नदीची एक खास गोष्ट आहे ती अशी, पाण्याचा प्रवाह कितीही जलद असला तरीही नदीच्या पाण्याचा आवाज ऐकू येत नाही. नदीपासून जवळच असणाऱ्या एका पर्वतावर सिद्धिविनायकाचे सुंदर मदिर आहे
-
बल्लाळेश्वर
भारत हा आस्था आणि विश्वासाने परिपूर्ण असा देश आहे. श्रीगणेशाची पूजा करून केलेलं सर्व काम निर्विघ्न पार पडतं, अशी आपल्या देशातील लोकांची आस्था आहे. प्रत्येक काम सफल करणारी देवता श्रीगणेशाला अष्टविनायक यात्रा समर्पित आहे. या यात्रेच्या तिसऱ्या क्रमांकावर आहे बल्लाळेश्वर मंदिर
-
वरदविनायक
अष्टविनायक यात्रेतील चौथा टप्पा म्हणजे वरदविनायक. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात एक सुंदर डोंगरदऱ्यांचं गाव आहे महाड, तिथे हे मंदिर स्थापित आहे. या मंदिराची खास गोष्ट ही आहे की, श्रीगणेशाची आराधना करण्यासाठी इथे एक दिवा नेहमी प्रज्वलित असतो. या दिव्याला नंदादीप असं म्हटलं जातं.
-
चिंतामणी
अष्टविनायकाच्या या सुंदर यात्रेमध्ये आता आपण आलो आहोत पाचव्या टप्प्यात. हा पाचवा टप्पा आहे चिंतामणी मंदिराचा. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील थेऊर गावात चिंतामणी विराजमान आहेत. असं सांगण्यात येतं की, चिंतामणीचं दर्शन घेऊन श्रीगणेश तुमच्या साऱ्या चिंता दूर सारतो. पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रेतील हे प्रसिद्ध मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. मंदिराच्या जवळच तीन नद्यांचा संगम आहे
-
गिरिजात्मक
सर्व दुःखाचं हरण करणाऱ्या श्रीगणेशाच्या अष्टविनायक यात्रेचा सहावा टप्पा आहे गिरिजात्मक. महाराष्ट्रातील पुण्यातील राजमार्गावर १० किलोमीटर दूर अंतरावर लेण्याद्री गावात हे अष्टविनायक मंदिर आहे. कुकडी नदी जवळ हे मंदिर स्थापित आहे. अष्टविनायक मंदिरांपैकी हे एकमेव मंदिर आहे जे उंच डोंगर आणि गुफांमध्ये स्थापित आहे
-
विघ्नेश्वर
अष्टविनायक यात्रेच्या सातव्या स्टॉपवर आणि ओझर जिल्ह्यातील जुन्नर भागात स्थित विघ्नेश्वर मंदिर येथे येतो. भाविकांच्या अडचणींना दूर करणारा महागणपतीचे हे स्वयम्भू मंदिर पुणे नाशिक रोडवर 85 किलोमीटर अंतरावर बांधले गेले आहे, अष्टविनायकातील हे एकमेव सुंदर ठिकाण आहे सोन्याचे शिखर, या मंदिरात येणारया भक्तांच्या सर्व अडचणी भगवान गणेश नक्कीच दूर करतात .
-
महागणपती
अष्टविनायक यात्रेचा शेवटचा थांबा पुण्यापासून 60० किलोमीटर अंतरावर रांझंन गावचे महागणपती मंदिर आहे. हे मंदिर 9 व्या किंवा 10 व्या शतकाच्या दरम्यानचे मानले जाते. पूर्व दिशेला मंदिराचे खूप मोठे आणि सुंदर प्रवेशद्वार आहे. जय आणि विजय हे दोन द्वारपाल या भव्य प्रवेशद्वारावर आहेत. येथे गणपतीची मूर्ती महोटक म्हणून ओळखली जाते.